“…पण काश्मीर पंडितांचा आक्रोश ऐकण्यासाठी कुणीही तयार नाही.”; राऊतांची टीका

मुंबई : काश्मीर हिंदूंचा रक्ताने भिजत चालला आहे. दररोज काश्मीर पंडितांच्या हत्या होत आहेत. आणि आमच्या दिल्लीतील नेते सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. काश्मीर मध्ये दिवसागणिक होत चाललेल्या बिकट परिस्थितीवर बोलताना रावतांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. 1990 मध्ये जेव्हा काश्मिरी पंडितांच्या हत्या झाली तेव्हा केंद्रात भाजपची सत्ता होती आणि आज ही भाजपची सत्ता आहे असं राऊत यांनी म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, कधी पण काश्मीर फाइल्स प्रमोशन होतय तर कधी पृथ्वीराज या चित्रपटाचे प्रमोशन केले जातंय. पण काश्मीर पंडितांचा आक्रोश ऐकण्यासाठी कुणीही तयार नाही.

तसेच काश्मीर मधून काश्मिरी पंडित पलायन करत आहेत. सरकारही भाजपचा आहे मात्र यावर बोलायला भाजपचे नेते तयार नाहीत. तुम्ही ताजमहाल खालचा शिवलिंग शोधत आहात तर कधी ज्ञानव्यापी झाली शिवलिंग असल्याचा दावा करताय. पण काश्मीर पंडितांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करताय, असा आरोपही राऊत यांनी लगावला आहे.

Leave Your Comment